Thursday, September 07, 2017

Untitled Post - 1

कुठल्याशा फुट्कळशा लेखाने शहाणं व्हायला झालं असतं तर बरं झालं असतं, नाही? आपण (म्हणजे मी) काहीबाही लिहितो. काssही दर्जा नसतो त्याला. स्वैर, अर्थहीन सगळं. उगाच आपलं उचललं पेन, लावलं कागदाला. पण मला माझं समाधान मात्र मिळत असतं त्यातून. मी काय लिहितो हे कुणाला आवडतं का किंवा कुणी खरंच impress होतं का, याची मुळीच जाणीव नाही मला. पण त्यातून अक्कल काही मिळत नाही हे मात्र खरं. म्हणजे मलातरी. बाकीच्यांचं माहित नाही. इतका विचार वगैरे करूनही मला अजून माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. नियंत्रण सोडाच हो, साधा अंदाज लावायला जमत नाही अजून. उगाच कधीही हसू येतं, उगाच कधीही रडू कोसळतं. कधीकधी उठून अख्खं जग जिंकायची उर्मी येते, तर कधी श्वास घेण्याचीही इच्छा संपते. मला माहित नाही का होतं असं; आणि ह्या माहित नसण्याचाच तर सगळ्यात जास्त त्रास होतो... 

No comments:

Post a Comment

Contact Form

Name

Email *

Message *